virsanghvi @PritishNandyNDA/UPA govt awarded padmas to journalists
depending on their political leanings, so why target chatwal now about
22 hours ago@PritishNandy @virsanghvi your campaign makes sense only
if we journalist agree not to accept padma awards, after all its a
favor fm govt
हे ट्वीटर मेसेज मी प्रीतीश नंदी आणि वीर संघवी यांना पाठवले. हा ब्लॉग
लिहिण्यापूर्वी त्यांच्याकडून काही उत्तर येतंय की नाही याची वाट पाहिली,
तब्बल चोवीस तास.... उत्तर आलंच नाही.
माझं म्हणणं एवढंच होतं की पद्म पुरस्कारांसंदर्भात सध्या जे वातावरण
गढूळ झालंय, ते दूर करण्याची मोहीम चांगली आहे. मात्र आपण पत्रकारांनी
निश्चय
करायला हवा की आपण पद्म पुरस्कार घेणार नाही. गेल्या दहा
वर्षांमध्ये NDA आणि UPA ने अनेक लायक पत्रकारांना पद्म पुरस्कार वाटले,
त्यावेळी आपण गप्प होतो. आपल्या बिरादरीने त्याच सरकारकडून पुरस्कार
स्वीकारला, ज्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं काम होतं. आणि आता आपण
म्हणतोय की, चटवाल पद्मभूषणच्या लायकीचे नाहीत.
चटवाल प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. संतसिंह चटवाल हे अमेरिकेत
राहणारे भारतीय. अनेक अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्स आहेत. मात्र
त्यामुळे प्रसिद्धी होत नाही, तर जे ज्या लोकांसमवेत उठतात, बसतात,
त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांच्या मित्र आणि स्नेह्यांच्या
यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून अनेक बड्यांचा
समावेश आहे. क्लिंटन यांचीच पत्नी सध्या अमेरिकेची परराष्ट्र मंत्री आहे.
म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्यातल्या मधुर संबंधांचा पद्मभूषण चटवाल
हे एक भाग आहेत. तर ते बदनाम आहेत, त्यांच्यावर दाखल झालेल्या एका 420
च्या प्रकरमामुळे. सीबीआयने 1992 मध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाला
28 कोटी रूपयांचा चुना लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. चटवाल
यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर सरकारने चटवाल त्या सर्व आरोपातून
निर्दोष मुक्त झाले असल्याचा निर्वाळा दिला होता. चटवाल कशा पद्धतीने
निर्दोष मुक्त झाले, याचा तपशील आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलाय.
चटवाल पद्मभूषणसाठी लायक आहेत की नालायक? या वादात मी पडू इच्छीत नाही.
आपणा सर्वांनाच माहितीय की पद्म पुरस्कार कसे मिळतात? सध्या अनेक
मोठ-मोठे पत्रकार पद्म पुरस्काराभोवती साठलेल्या वातावरणाला स्वच्छ करू
इच्छितात, त्यासाठी त्यांनी एक मोहीम छेडलीय. पण माझी पद्मश्री, तुमच्या
पद्मश्रीपेक्षा जास्त स्वच्छ कशी? हे एक ढोंगच नाही का? मराठीत याला
दुधाला जाऊन भाडं लपवणं म्हणतात.
ठीक आहे, तुम्ही म्हणाल, अजून कुण्या पत्रकारावर 420 चा गुन्हा दाखल
झालेला नाही. तरीही सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की कोणते पत्रकार एनडीएच्या
राजवटीत पद्म पुरस्कारासाठी लायक होते आणि कोणते पत्रकार यूपीए राजवटीत
पद्म पुरस्कारासाठी लायक होते.
पद्मश्री मिळालेल्या पत्रकारांच्या यादीवर एक नजर टाका आणि यावेळी
पद्मश्री पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीवर... वीरेन्द्र सहवागला यावर्षी
पद्मश्री मिळाली. सचिन तेंडुलकरचे कोच रमाकांत आचरेकर यांनाही याच वेळी
पद्मश्री पुरस्कार देण्यायोग्य समजलं गेलं. याआधी अनेक पत्रकारांनाही
पद्मश्री मिळालीय. सरकारच्या मते सहवाग आणि आचरेकर यांच्याही आधी
पत्रकारांनी या देशाचं भलं केलंय, देशाच्या विकासात योगदान दिलंय. एकवेळ
कामाची तुलना सोडून देऊ, पण यावर तुमचंही एकमत होईल की, पद्मश्रीच्या
निमित्ताने सरकार आपल्याला लाच देतंय आणि आपण आपल्या कर्तृत्वाचा सन्मान
म्हणून त्याचा स्वीकारही करतो.
अजून चोवीस तास झाले तरी मला ट्विटरवरून ना प्रीतीश नंदींचं काही उत्तर
आलंय, ना वीर संघवींचं... तुम्हाला काय वाटतं, काही उत्तर येईल?