काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ... हा नारा आता बदलण्याची गरज आहे. कारण आम आदमीची चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला नसल्याचं दिसतय. राज्यासमोर महागाई, पाणीटंचाई यांसारख्या समस्या असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या रिनोव्हेशनवर कोट्यवधी रुपये खर्च केलेत. त्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा नाही पण मंत्र्यांच्या बंगल्यांचा चेहरामोहरा नक्कीच बदललाय.वर्षा बंगला... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं निवासस्थान... राज्याची सूत्रं गेल्या 30 वर्षांपासून याच बंगल्यातून हलतायत... त्यामुळं साहजिकच वर्षाचं वैभवही त्याला साजेसच असणार... बंगल्याच्या प्रवेशद्वारापासून इथंली प्रत्येत वस्तू खास आहे. मात्र अशोक चव्हाण इथली
प्रत्येक बाब आपल्या मनाप्रमाण बदलू इच्छितायत.. कदाचित त्यांना माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे अंतर्गत विरोधक विलासरावांची प्रत्येक आठवण या बंगल्यातून पुसून टाकायची असेल... त्यामुळे वर्षातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा रिनोव्हेट केला जातोय. आणि त्यासाठी आतापर्यंत तब्बल 96 लाख रूपये खर्च आलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री बंगल्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या तोरणा बंगल्यावरही 65 लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 17 मंत्र्यांनी आपआपल्या बंगल्यांच्या रिनोव्हेशनसाठी लाखो रुपये पाण्यासारखे खर्च केलेत.
1. उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी रामटेक बंगल्यावर 43 लाख रुपये खर्च केलेत.
विशेष म्हणजे छगन भुजबळ गेली १० वर्ष मंत्री असताना आणि नसताना याच बंगल्यात राहतात
2. राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या सातपुडा बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी तब्बल 88 लाख रुपये खर्च केलेत.
3. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या उपवन बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी 71 लाखांचा चुराडा केलाय़.
4. १ लाख ५० हजाराचं कोटी रुपयांचं कर्ज असणा-या राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरेंनी मधुदंत बंगल्यावर 50 लाख रुपये खर्च केलेत.
5. महसूलमंत्री राणेंनी आपल्या ज्ञानेश्वरी निवासस्थानासाठी 44 लाख 50 हजार रुपये पाण्यासारखे खर्च
केलेत.
6. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या अजंठा बंगल्यावर 34 लाख रुपये खर्च केलेत.
7. तर परिवहन मंत्री राधाकृष्ण विखेंनी सागर निवासस्थानाच्या रिनोव्हेशनवर 40 लाखांचा चुराडा केलाय.
8. उर्जामंत्री अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर 29 लाखांचा खर्च केला
9. विधानसभेचे सभापती वळसे पाटील यांनीही शिवगिरी बंगल्यावर 39 लाखांचा चुराडा केलाय.
10. कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सेवासदन बंगल्यावर 26 लाखांचा खर्च केलाय.
11. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी रॉयलस्टोन बंगल्यावर 38 लाख रुपये खर्च केलेत
12. तर उद्योग मंत्री राजेंद्र दर्डांनी बंगल्याच्या रिनोव्हेशनसाठी 38 लाख रुपयांचा चुराडा केलाय.
कोट्यवधी रुपयांच्या चुराड्याच मुख्यमंत्र्यांना मात्र काहीच सोयरसुतक नसल्याचं दिसतय. या सगळ्या मंत्र्यांच्या
घरांवर आतापर्यंत 8 कोटीं रुपयांचा चुराडा झालाय. राज्यासमोर सद्यस्थितीला अनेक संकटं आहेत. पाणीटंचाईमुळे लोकांना मैलोनमैल वणवण करावी लागतेय. महागाईमुळे सामान्यांचं जगणं अवघड झालय. अशा अवस्थेत राज्य सरकारमधील मंत्री आपल्या घरांची शानोशौकत वाढवण्यात मश्गुल आहेत. त्यासाठी लोकांच्या खिशातून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातोय. नेत्यांनी केलेला खर्च विकासकामांपेक्षा गरजेचा होता का?