सोहराबुद्दीन शेख यांची २००५ साली हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दावा करण्यात आला होता की सोहराबु्ददीन गुजरात आणि राजस्थान पोलिसांशी झालेल्या बनावट चकमकीत मारले गेले आहेत. दुसरा आरोप असाही होता की, सोहराबुद्दीन शेख यांच्या शिवाय त्यांच्या पत्नी कौसर बी आणि तुलसी प्रजापति यांचं एका बस स्टॅण्डवरून अपहरण झालं होतं. आरोप असाही आहे की सोहराबु्द्दीन शेख यांची पत्नी कौसरलाही ठार करण्यात आलंय. अजूनही कौसरचं शव मिळालेलं नाही.
एक वर्षानंतर तुलसी प्रजापतिही कथित बनावट चकमकीत मारले गेले. त्यानंतर अनेक वेळा झालेल्या चौकशीत हे समोर आलं की सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीत मारले गेले होते. सुप्रीम कोर्टानं हा तपास यावर्षीच्या सुरूवातीला सीबीआयकडे सोपवला.
सीबीआयचा असा दावा आहे की त्यांच्याकडे अमित शाह यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत.
दरम्यान अमित शाह यांनी एका वक्तव्यात म्हटलंय की आपण कोणतही बेकायदेशीर काम केलेलं नाही. अमित शाह यांनी असही म्हटलंही की ज्या पद्धतीने आपल्याला घाईघाईत नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे यात प्रकरणात राजकीय हात असल्याचा संशय बळावला आहे असही शाह यांनी म्हटलंय.
गुजरातचे गृह राज्यमंत्री अमित शाह यांच्यावर बनावट चकमकीत सहभागी असलेल्या डागाळलेल्या पोलिस अधिका-यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.
ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर बनावट चकमकीत सहभागी असल्याचा आरोप आहे. यातील अनेक अधिकारी जेलची हवा खात आहेत. अभय चुडासमा, डीजी वंजारा आणि राजकुमार पांडियन हे प्रमुख अधिकारी आहेत.
याप्रकरणी अमित शाह यांनी दुसऱ्या एका न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
जाणकारांच्या मते आरोप पत्र दाखल झाल्याने सीबीआयला अमित शाह यांच्या अटकेसाठी मार्ग खुला झाला आहे.