सही रे सही नाटकामधला प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा भरत जाधवचा गलगले पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणारंय..फरक एवढाच की आता हे नाटक श्री चिंतामणी ऐवजी सुयोगतर्फे रंगमंचावर येतंय.
या निर्मितीला श्री चिंतामणीनं आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. मात्र लघुवाद न्यायालयानं दोन्ही बाजून ऐकून घेतल्यावर सुयोगच्या बाजूनं कौल दिलाय. त्यामुळं सुयोग निर्मित पुन्हा सही रे सही या नाटकाचा मार्ग मोकळा झालाय.
1 ऑगस्ट पासून सुयोगचं पुन्हा सही रे सही रंगमचावर येतंय. केंदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे अकराशेहून अधिक प्रयोग झालेले आहेत.
याआधीचे सगळे प्रयोग श्री चिंतामणीतर्फे निर्मित करण्यात आलेत. मात्र भरत जाधवच्या भूमिकेवरुन झालेल्या वादानंतर केदार शिंदेनं सुयोगची वाट धऱली. त्यानंतर पुन्हा सही रे सही नावानं हे नाटक रंगमंचावर येतंय.